Ad will apear here
Next
वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. रत्नदीप जोशी
पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी २०१८ रोजी वैज्ञानिक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. रत्नदीप जोशी या कट्ट्यावर येणार असून, ‘दैनंदिन जीवनात रासायनिक अभियांत्रिकीचा वापर’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत. 

शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी चार वाजता सेनापती बापट रस्त्यावरील ‘मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रा’च्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र. यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिनांक : शनिवार, २४ फेब्रुवारी २०१८
वेळ : दुपारी चार वाजता
स्थळ : विज्ञान शोधिका – एक्सप्लोरेटरी, भारतीय विद्या भवन समोर, सेनापती बापट मार्ग, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZPWBL
Similar Posts
वैज्ञानिक कट्ट्यावर सचिन सातपुते पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर एमकेसीएलच्या ई-प्रशासन विभागाचे सरव्यवस्थापक सचिन सातपुते येणार आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा त्यांच्या गप्पांचा विषय असणार आहे
‘रासायनिक अभियांत्रिकीमुळे दैनंदिन जीवन सुकर’ पुणे : ‘आयुर्वेदिक उत्पादने, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने यामध्ये रासायनिक अभियांत्रिकीचा मोठा वापर केला जातो. तसेच वैद्यकीय क्षेत्रात तात्काळ आराम देणाऱ्या वेदनारहित औषधांमध्येही प्रभावी रसायने वापरली जातात. त्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सुकर होत आहे,’ असे मत एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ
मानवी संस्कृतीच्या अभ्यासात‘डीएनए’मोठी संधी पुणे : ‘मानवी संस्कृती, पर्यावरण आदी गोष्टींच्या अभ्यासासाठी उत्खनन महत्वाचे ठरते. पुरातत्वशास्त्राने अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. हजारो वर्षांपूर्वी मानवी वस्त्या कशा असतील, त्यावेळचे राहणीमान, व्यापार, पर्यावरण कसे असेल, याबाबतचा अभ्यास करण्यासाठी आज अनेक ठिकाणी उत्खनन सुरु आहे. या मानवी संस्कृतीच्या
‘कष्टाऐवजी बुद्धीच्या कामांना प्राधान्य’ पुणे : ​‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापराने आज अनेक उपकरणे विकसित होत आहेत. आरोग्याची काळजी घेणारी ही उपकरणे भविष्यात माणसाचे आयुर्मान वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अवघड आणि अशक्य कामे रोबोटकडून होऊ लागले आहेत. त्यामुळे माणसाला यापुढे कष्टाची नाही, तर बुद्धीची कामे करण्याला प्राधान्य

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language